॥ श्री गुरुचरित्र ॥

॥ अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र ॥

श्री गुरुचरित्र माहिती

॥ श्री गुरुचरित्र ॥

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

सिद्धनामधारक याच्या संवादातून ‘॥ श्री गुरुचरित्र ॥ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजेश्रीनृसिंहसरस्वतीनामधारक म्हणजेसरस्वती गंगाधर, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

॥ श्री गुरुचरित्र ॥ संदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे आचरण कसे ठेवावे ह्याच्या संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन ॥ श्री गुरुचरित्र ॥ मधे केलेले आहे.

‘॥ श्री गुरुचरित्र ॥ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात / घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतात ज्यांचे निराकरण होणे बर्‍याचदा कठीण असते अश्यावेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेऊन प्रार्थना करणे, लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते, आपण फक्त संकल्प स्वरुपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि साप्ताहाचे नियम असतील त्या प्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण.
नियमीत पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध, आंदमयी होते.

॥ श्री गुरुचरित्र ॥ ग्रंथात वाचन / पारायण तीन प्रकारे करता येईल, असे सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे.
वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे.

  • पहिला प्रकार –
    ‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम। शुद्ध  अंतःकरणाने / भावनेने कधीही पारायण करता येऊ शकते.
  • दुसरा प्रकार –
    ॥ सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथा स्थिती । शूचिर्भूत होवोनी शास्त्ररीती । सप्ताह करीता बहूपुण्य ॥ दिनशुद्धी बरवी पाहून । आवश्यक स्नान संध्यादिक करुन । पुस्तक वाचावयाचे स्थान । रंगविल्याही शोभा करावी ॥ देशकालाही संकल्प करुन । पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन । यथोपचारे करुन । ब्राह्मणासही पूजावे ॥ प्रथमदिवसापासोन । बैसावया असावे एकस्थान । अतत्वार्थ भाषणी धरावे मौन । कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान । देव ब्राह्मण वडिल वंदून पूर्वोत्तर मुख करुन । वाचती प्रारंभ करावा ॥ नव संख्या अध्याय प्रथमदिनी । एकविशती पर्यंत द्वितीयदिनी । एकोनत्रिशंत तृतीयदिनी । चतुर्थीदिनी पंचतीस ॥ अडतीसपर्यंत पांचवेदिन । त्रेचाळीसवरी सहावेदिनी । सप्तमी बावन्न वाचोनी । अवतराणिका वाचावी ॥

    अशी सप्ताहपद्धती ते सांगतात. नंतर उत्तरपूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे, ब्राह्मण सुवासिनीस भोजन-दक्षिणा द्यावी, त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे.
  • तिसरा प्रकार –
    ‘धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध । म्हणजेच लेखनस्वरूपात सेवा करावी.’

    ‘सदा वाचावे गुरुचरित्र’ या ओवीचे दोन अर्थ आहेत. सदाम्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव । दररोज वाचताना एक फायदा होतो.

विस्तृत माहिती साठी इथे बघा.

  • ॥ श्री गुरुचरित्र ॥ हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. 
  • स्त्रियांनी ॥ श्री गुरुचरित्र ॥ वाचावे की नाही ह्या बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत.
  • स्त्रियांनी ॥ श्री गुरुचरित्र ॥ वाचू नये असा श्री. प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा निष्कर्ष आहे.
  • पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. 
Scroll to Top