॥ श्री दत्त जयंती ॥
Shri Datta Jayanti

दत्त जयंती, ज्याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटले जाते, हा एक हिंदू सण आहे, जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश (महादेव, शिव) यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली हिंदू देवता दत्तात्रेय (दत्त) यांच्या जन्मदिवसाचा  उत्सव साजरा करतो.

संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेला (साधारण पणे डिसेंबर महिन्यात) हा दिवस साजरा केला जातो.

दत्तजन्म कथा

दत्तात्रय हा शब्द “दत्त” आणि  “आत्रेय” अशा दोन शब्दांनी बनला आहे. “दत्त” या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि दत्तात्रय हा शब्द “दत्त”“आत्रेय” अशा दोन शब्दांनी बनला आहे. “दत्त” या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि “अत्रेय” म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली. 

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

दत्तजयंती माहिती

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

 

दत्तजयंतीचे महत्त्व

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

 

जन्मोत्सव साजरा करणे

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. 

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले ….
मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी ।

दत्तजयंती आणखी माहिती

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

श्री दत्त संप्रदायातील साधक ‘अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त’ असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.

श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार, ‘श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा तर ‘स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची ‘नेमिनाथ’ म्हणून पूजा करतात तर मुसलमान ‘फकिर’ म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते. 

गुरूचरित्र – अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः ।

ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥

ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥

प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥

पूर्वी सृष्टि नव्हती काही । जलमय होते सर्वही । आपोनारायण म्हणोनि पाही । वेद बोलती याची कारणे ॥४॥

उदक आपोनारायण । सर्वां ठायी वास पूर्ण । बुद्धिसंभवप्रपंचगुण । हिरण्यगर्भ अंड निर्मिले ॥५॥

तेचि ब्रह्मांड नाम जाहले । रजोगुने ब्रह्मासि निर्मिले । हिरण्यगर्भ नाम पावले । देवतावर्ष एक होते ॥६॥

तेचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकले झाली ऐका । एक शकल भूमिका । होऊनि ठेली शकले दोनी ॥७॥

ब्रह्मा तेथे उपजोन । रचिले चवदाहि भुवन । दाही दिशा मानसवचन । काळ कामक्रोधादि सकळ ॥८॥

सृष्टि रचावयासी । सप्त पुत्र उपजवी मानसी । नामे सांगेन परियेसी । सात जण ब्रह्मपुत्र ॥९॥

मरीचि अत्रि आंगिरस । पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ । सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ । सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण ॥१०॥

सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि । तेथूनि पीठ गुरुसंतति । सांगेन ऐका एकचित्ती । सभाग्य नामधारका ॥११॥

ऋषि अत्रीची भार्या । नाम तिचे अनसूया । पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥१२॥

तिचे सौंदर्यलक्षण । वर्णू शके ऐसा कोण । जिचा पुत्र चंद्र आपण । तिचे रूप काय सांगो ॥१३॥

पतिसेवा करी बहुत । समस्त सुरवर भयाभीत । स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित । म्हणोनि चिंतिती मानसी ॥१४॥

इंद्रादि सुरवर मिळुनि । त्रयमूर्तिपासी जाउनी । विनविताती प्रकाशोनी । आचार अत्रि ऋषीचा ॥१५॥

इंद्र म्हणे स्वामिया । पतिव्रता स्त्री अनसूया । आचार तिचा सांगो काया । तुम्हाप्रती विस्तारोनि ॥१६॥

पतिसेवा करी भक्तीसी । मनोवाक्कायमानसी । अतिथिपूजा महाहर्षी । विमुख नव्हे कवणे काळी ॥१७॥

तिचा आचार देखोनि । सूर्य भीतसे गगनी । उष्ण तिजला होईल म्हणोनि । मंद मंद तपतसे ॥१८॥

अग्नि झाला भयाभीत । शीतळ असे वर्तत । वायु झाला भयचकित । मंद मंद वर्ततसे ॥१९॥

भूमि आपण भिऊनि देखा । नम्र जाहली पादुका । शाप देईल म्हणोनि ऐका । समस्त आम्ही भीतसो ॥२०॥

नेणो घेईल कवण स्थान । कोण्या देवाचे हिरोन । एखाद्याते वर देता जाण । तोही आमुते मारू शके ॥२१॥

यासि करावा उपाय । तू जगदात्मा देवराय । जाईल आमुचा स्वर्गठाय । म्हणोनि आलो तुम्हा सांगो ॥२२॥

न कराल जरी उपाय यासी । सेवा करू आम्ही तिसी । तिचे द्वारी अहर्निशी । राहू चित्त धरोनिया ॥२३॥

ऐसे ऐकोनि त्रयमूर्ति । महाक्रोधे कापती । चला जाऊ पाहू कैसी सती । म्हणती आहे पतिव्रता ॥२४॥

वतभंग करूनी तिसी । ठेवूनि येऊ भूमीसी । अथवा वैवस्वतालयासी । पाठवू म्हणोनि निघाले ॥२५॥

सत्त्व पहावया सतीचे । त्रयमूर्ती वेष भिक्षुकाचे । आश्रमा आले अत्रीचे । अभ्यागत होऊनिया ॥२६॥

ऋषि करू गेला अनुष्ठान । मागे आले त्रयमूर्ति आपण । अनसूयेसी आश्वासून । अतिथि आपण आलो म्हणती ॥२७॥

क्षुधे बहु पीडोन । आम्ही आलो ब्राह्मण । त्वरित द्यावे सती अन्न । अथवा जाऊ आणिका ठाया ॥२८॥

सदा तुमचे आश्रमांत । संतर्पण अभ्यागत । ऐको आली कीर्ति विख्यात । म्हणोनि आलो अनसूये ॥२९॥

इच्छाभोजनदान तुम्ही । देता म्हणोनि ऐकिले आम्ही । ठाकोनि आलो याचि कामी । इच्छाभोजन मागावाया ॥३०॥

इतुके ऐकोनि अनसूया । नमन केले तत्क्षणिया । बैसकार करूनिया । क्षालन केले चरण त्यांचे ॥३१॥

अर्ध्य पाद्य देऊनि त्यांसी । गंधाक्षतापुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी । आरोगण सारिजे ॥३२॥

अतिथी म्हणे तये वेळी । करोनि आलो आंघोळी । ऋषि येती बहुता वेळी । त्वरित आम्हा भोजन द्यावे ॥३३॥

वासना पाहोनि अतिथीते । काय केले पतिव्रते । ठाय घातले त्वरिते । बैसकार केला देखा ॥३४॥

बैसवोनिया पाटावरी । घृतेसी पात्र अभिधारी । घेवोनी आली आपण क्षीरी । शाक पाक तये वेळी ॥३५॥

तिसी म्हणती अहो नारी । आम्ही अतिथी आलो दुरी । देखोनि तुझे स्वरूप सुंदरी । अभीष्ट मानसी आणिक वसे ॥३६॥

नग्न होवोनि आम्हांसी । अन्न वाढावे परियेसी । अथवा काय निरोप देशी । आम्ही जाऊ नाही तरी ॥३७॥

ऐकोनि द्विजांचे वचन । अनसूया करी चिंतन । आले विप्र पहावया मन । कारणिक पुरुष होतील ॥३८॥

पतिव्रता शिरोमणी । विचार करी अंतःकरणी । अतिथी विमुख तरी हानि । निरोप केवी उल्लंघू ॥३९॥

माझे मन असे निर्मळ । काय करील मन्मथ खळ । पतीचे असे तपफळ । तारील मज म्हणतसे ॥४०॥

ऐसे विचारोनि मानसी । तथास्तु म्हणे तयांसी । भोजन करावे स्वस्थ चित्तेसी । नग्न वाढीन म्हणतसे ॥४१॥

पाकस्थाना जाऊनि आपण । चिंतन करी पतीचे चरण । वस्त्र फेडोनि नग्न । म्हणे अतिथी बाळे माझी ॥४२॥

नग्न होवोनी सती देखा । घेऊनि आली अन्नोदका । तव तेचि झाले बाळका । ठायांपुढे लोळती ॥४३॥

बाळे देखोनि अनसूया । भयचकित होवोनिया । पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली तया बाळकांजवळी ॥४४॥

रुदन करिती तिन्ही बाळे । अनसूया रहावी वेळोवेळ । क्षुधार्त झाली केवळ । म्हणोनि कडिये घेतसे ॥४५॥

कडिये घेवोनि बाळकांसी । स्तनपान करवी अतिहर्षी । एका सांडोनि एकाशी । क्षुधा निवारण करितसे ॥४६॥

पाहे पा नवल काय घडले । त्रयमूर्तीची झाली बाळे । स्तनपान मात्रे तोषले । तपफळ ऐसे पतिव्रतेचे ॥४७॥

ज्याचे उदरी चौदा भुवन । सप्त समुद्र वडवाग्नि जाण । त्याची क्षुधा निवारण । पतिव्रतास्तनपानी ॥४८॥

चतुर्मुख ब्रह्मयासी । सृष्टि करणे अहर्निशी । त्याची क्षुधा स्तनपानेसी । केवी झाली निवारण ॥४९॥

भाळाक्ष कर्पूर गौर । पंचवक्त्र काळाग्निरुद्र । स्तनपान करवी अनसूया सुंदर । तपस्वी अत्री ऐसा ॥५०॥

अनसूया अत्रिरमणी । नव्हती ऐशी कोणी । त्रयमूर्तीची झाली जननी । ख्याति झाली त्रिभुवनांत ॥५१॥

कडिये घेवोनि बाळकांसी । खेळवीतसे तिघांसी । घालोनिया पाळण्यासी । पर्यंदे गाई तये वेळी ॥५२॥

पर्यंदे गाय नानापरी । उपनिषदार्थ अतिकुसरी । अतिउल्हासे सप्त स्वरी । संबोखितसे त्रिमूर्तीसी ॥५३॥

इतुके होता तये वेळी । माध्यान्हवेळ अतिथिकाळी । अत्रि ऋषि अतिनिर्मळी । आला आपुले आश्रमा ॥५४॥

घरामाजी अवलोकिता । तव देखिली अनसूया गाता । कैची बाळे ऐसे म्हणता । पुसतसे स्त्रियेसी ॥५५॥

तिणे सांगितला वृत्तान्त । ऋषि ज्ञानी असे पाहात । त्रयमूर्ति हेचि म्हणत । नमस्कार करितसे ॥५६॥

नमस्कारिता अत्रि देखा । संतोष विष्णुवृषनायका । आनंद झाला चतुर्मुखा । प्रसन्न झाले तये वेळी ॥५७॥

बाळ राहिले पाळणेसी । निजमूर्ति ठाकले सन्मुखेसी । साधु साधु अत्रि ऋषि । अनसूया सत्य पतिव्रता ॥५८॥

तुष्टलो तुझे भक्तीसी । माग मनी वर इच्छिसी । अत्रि म्हणे सतीसी । जे वांछिसी माग आता ॥५९॥

अनसूया म्हणे ऋषीसी । प्राणेश्वरा तूचि होसी । देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता ॥६०॥

तिघे बाळक माझे घरी । रहावे माझे पुत्रापरी । हेचि मागतो निर्धारी । त्रयमूर्ति आपणां एकरूपा ॥६१॥

ऐसे वचन ऐकोनि । वर दिधला मूर्ती तिन्ही । राहती बाळके म्हणोनि । आपण गेले निजालयासी ॥६२॥

त्रिमूर्ति राहिले त्यांचे घरी । अनसूया पोशी बाळकापरी । नामे ठेविली प्रीतिकरी । त्रिवर्गांची परियेसा ॥६३॥

ब्रह्मामूर्ति चंद्र झाला । विष्णुमूर्ति दत्त केवळा । ईश्वर तो दुर्वास नाम पावला । तिघे पुत्र अनसूयेचे ॥६४॥

दुर्वास आणि चंद्र देखा । उभे राहूनि मातेसन्मुखा । निरोप मागती कौतुका । जाऊ तपा निजस्थाना ॥६५॥

दुर्वास म्हणे जननी । आम्ही ऋषि अनुष्ठानी । जाऊ तीर्थे आचरोनि । म्हणोनि निरोप घेतला ॥६६॥

चंद्र म्हणे अहो माते । निरोप द्यावा आम्हा त्वरिते । चंद्रमंडळी वास माते । नित्य दर्शन तुमचे चरणी ॥६७॥

तिसरा दत्त विष्णुमूर्ति । असेल तुमचे धरोनि चित्ती । त्रयमूर्ति तोचि निश्चिती । म्हणोनि सांगती तियेसी ॥६८॥

त्रयमूर्ति जाण तोचि दत्त । सर्व विष्णुमय जगत । राहील तुमचे धरोनि चित्त । विष्णुमूर्ति दत्तात्रेय ॥६९॥

त्रयमूर्ति ऐक्य होऊन । दत्तात्रेय राहिला आपण । दुर्वास चंद्र निरोप घेऊन । गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ॥७०॥

अनसूयेचे घरी देखा । त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका । नाम दत्तात्रेय एका । मूळपीठ श्रीगुरूचे ॥७१॥

ऐशापरी सिद्ध देखा । कथा सांगे नामधारका । संतोषे प्रश्न करी अनेका । पुसतसे सिद्धासी ॥७२॥

जय सिद्ध योगीश्वरा । भक्तजनमनोहरा । तारक संसारसागरा । ज्ञानमूर्ति कृपासिंधो ॥७३॥

तुझेनि प्रसादे मज । ज्ञान उपजले सहज । तारक आमुचा योगिराज । विनंती माझी परियेसा ॥७४॥

दत्तात्रेयाचा अवतारू । सांगितला पूर्वापारू । पुढे अवतार जाहले गुरु । कवणेपरी निरोपिजे ॥७५॥

म्हणे सरस्वतीगंगाधरू । पुढील कथेचा विस्तारू । ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥७६॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

ओवीसंख्या ७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top